अलिबागकारांना अभिमानास्पद..! रायगड भूषण जयपाल पाटील करणार जागतिक आपत्ती परिषदेच्या सेमिनारमध्ये शोध निबंधाचे वाचन
अलिबाग. (प्रतिनिधी) – केंद्र सरकार आणि राज्य शासनाने मान्यता दिलेले आपत्ती व सुरक्षा विषयक तज्ञ रायगड भूषण ज्येष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांनी लिहिलेला आशावादी उद्याचे या कोवीड नंतर काय अशा विषयाचा लेख जागतिक आपत्ती परिषदेच्या सेमिनारमध्ये २००० आपत्ती व सुरक्षा तज्ञांसमोर सादर करण्याचे पत्र परिषदेचे संयोजक डॉ. एस. आनंद बाबू यांनी पाठविले आहे.
जयपाल पाटील यांनी साप्ताहिक रायगडचा युवक तर्फे सन २०१५ साली आपत्ती विषयक प्रशिक्षण आयोजित करुन नागरीक संरक्षण दल उरण, होमगार्ड कॉलेज मुंबई, यशदा पुणे, भारतीय सैन्य सिख रेजिमेंट राँची झारखंड व चौथ्या जागतिक परिषदेत प्रशिक्षण घेतले. यामध्ये त्यांना वरिष्ठ उपनियंत्रक सिव्हील डिफेन्सचे मंगसूळे सर, सहाय्यक उपनियंत्रक आनंद शिंदे सर, होमगार्ड कॉलेजच्या प्रिन्सिपल कोरी मॅडम व इतर शिक्षक, शिख रेजिमेंटचे सीईओ लेफ्टनंट कर्नल लक्ष्मिकांत देसाई यांच्याकडून प्रशिक्षण आणि ब्रिगेडीअर हेमंत महाजन, मेजर अरविंद रानडे, डॉ. सिध्दार्थ पाटील, डॉ. अजित गवळी, डॉ. राजेश्वरी, डॉ.जी.टी.पाटील, डॉ.प्रताप दिघावकर, डॉ.मिलिंद दुसाणे,नितीन वागळे,सुनील प्रधान,एडवोकेट रेश्मा पाटील, एडवोकेट सचिन जोशी यांचे मार्गदर्शन तसेच जयश्री पाटील, सत्यम पाटील, पल्लवी वैद्य, प्रसाद वैद्य, रोहिणी वैद्य, सुभाष म्हात्रे (पत्रकार), सुरेश खडपे (छायाचित्रकार), विकास रणपिसे (छायाचित्रकार,आपत्ती व सुरक्षा मित्र) तसेच महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र मधील १०८ बी.व्ही.जी.चे अधिकारी, डॉक्टर, पायलट, पत्रकार यांच्या सहकार्याने लाखो नागरीकांना आपत्ती व सुरक्षा विषयक ज्ञानदानाचे महत्वाचे कार्य केले. याची नोंद घेवून रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्कार देवून सन्मान केला. महाराष्ट्रातील आपत्ती व सुरक्षा विषयक प्रशिक्षण देणारे एकमेव पत्रकार जे राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय पत्रकर संघाचे व प्रवक्ता, संपादक, पत्रकार संघ मुबंई चे असून, त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व आताच्या राज्याच्या मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या ९७ हजार विद्यार्थी व ६२०० शिक्षकांना हे महत्वाचे प्रशिक्षण देण्याची मंजूरी दिली असता, हे प्रशिक्षण रायगड जिल्हाधिकारी आपत्ती प्रतिसाद दलाच्या सहयोगाने करावे यासाठी तेव्हाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी यासाठी ५० हजाराचे अनुदान मंजूर केले आहे आणि कोविड -१९ सुरु झाल्याने हे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आले आहे. कोविड – १९ मध्ये मागील वर्षभर पंतप्रधान कार्यक्रम ९ नुसार देशभरातील आपत्ती तज्ञांना कोवीड नंतर प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेतर्फे १,२, ते ३ दिवस दिवसाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये जयपाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यानी आपत्ती व्यवस्थापनची भाषणे मुबंई, रत्नागिरी, सोलापूर आकाशवाणी केंद्र मधून प्रसारित झाली होत आहेत. कोविड – १९ मध्ये रायगडचा युवक फाउंडेशनने वेगवेगळे उपक्रम राबविले. यामध्ये ५५० नागरीकांना मोफत मास्क वाटप केले. ई-प्रवास पासाबाबत मार्गदर्शन, औषधे घरपोच पोहचविणे आणि कुत्री-जनावरे यांना पाणी-जेवण उपलब्ध करुन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना मदत करण्याचे कार्य केल्यानेच कोरोना योध्दा म्हणून दैनिक मॉडर्न, दैनिक प्रतिवीर, बहुजन एकता महासंघ, समीरा प्रतिष्ठान, पोलीस जाणीव सेवा संघ, सारळ ग्रामस्थ कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना यांनी कोरोना योध्दा म्हणून सन्मान केला.
येत्या २४ ते २७ नोव्हेंबर २०२१ रोजी आय.आय.टी. दिल्ली येथे होणाऱ्या ५ व्या जागतिक परिषदेमध्ये कोविड – १९ या नंतरच्या परिस्थितीवर कसे सामोरे जायचे याविषयी जगभरातील लेखकांकडून लेखांची मागणी आयोजकांनी केली होती. त्यासाठी जयपाल पाटील यांचा आशावादी उद्याचे हा १३८ क्रमांकाचा लेख पोहोचला होता. त्याची जागतिक आपत्ती परिषदेच्या निघणाऱ्या पुस्तिकेमध्ये निवड झाली असून हा शोध निबंध आता तो या परिषदेमध्ये उपस्थितांना वाचन करण्याचे पत्र ५ व्या जागतिक परिषदेचे संयोजक डॉ. एस. आनंद बाबू यांनी पाठविले आहे. याबद्दल जयपाल पाटील यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.