शिवचरित्राचा उपयोग वाद निर्मितीसाठी नको, – प्रा. डॉ. संजय पाईकराव
शंकर नारायण महाविद्यालयाच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन.
भाईंदर. ( प्रतिनिधी) – कोविड -19 महामारीच्या कठीण प्रसंगात जनतेत उत्साह भरण्यासाठी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या प्रमाणात विविध ऑनलाईन माध्यमांच्या आधारे साजरा करण्यासाठी सरकारने भर दिला. त्याच्या अनुषंगाने येथील शंकर नारायण महाविद्यालयात दोन टप्प्यात कार्यक्रम साजरा केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आणि शिवराज्याभिषेकाचे महत्व या विषयावर ऑनलाईन व्याख्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अतिथी प्राध्यापक तथा जेष्ठ संशोधक संजय पाईकराव यांनी माहितीपूर्ण व्याख्यान दिले. या प्रसंगी राजकीय सामाजिक वादातून शिवचरित्राचा दुरुपयोग करणाऱ्यांवर त्यानी कोरडे ओढले.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या शिखराचा सामना करून झाल्यावर सध्या आपण पुन्हा एकदा अनलॉक च्या प्रक्रियेत आहोत. मागच्या पेक्षा या वेळेचा अनुभव सर्वसामान्याना साठी जास्त विदारक होता. त्यातच तिसऱ्या लाटेची भीती आहेच. या वातावरणात शिव चरित्रातून लोकांच्या मनात उत्साह भरण्यासाठी प्रस्तुत उपक्रम राबवण्यात आला. एक संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाईन माध्यमातून राबवल्या वर आता पुढच्या शैक्षणिक वर्ष साठी सुद्धा याच पद्धतीचा प्रभावी वापर करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र तयार आहे. शासकीय निर्देशांना सकारात्मक पाने घेत शंकर नारायण महाविद्यालयाने या शिवराज्याभिषेक तथा शिव स्वराज्य दिनाची तयारी केली. महाविद्यालयाच्या IQAC आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन टप्प्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या टप्प्यात दि. 06 जून रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात छोटेखानी कार्यक्रम घेत शिवप्रतिमेला अभिवादन करण्यात आले. श्री शंकर नारायण एजुकेशन ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी, प्राचार्य आणि महाविद्यालयाचे आसपास च्या परिसरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व सुरक्षा उपाययोजनांचे पालन करत या आयोजनात सहभाग घेतला. गौतम सुतार या विद्यार्थ्याने शिवराज्याभिषेक प्रसंगावर सुंदर रांगोळी चितारून शोभा वाढवली. संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी या महामारीच्या कालखंडात कार्यरत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. जीवनातील संकटाना सामोरे जाण्यासाठी शिवचरित्रातील अनेक प्रसंग प्रेरणादायक ठरतील याची जाणीव करून दिली. दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन व्याख्यानातं प्रा. डॉ. संजय पाईकराव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अनेक प्रसंगांद्वारे स्पष्ट केले. या प्रसंगातून दिसून येणारी त्यांची भूमिका त्यांनी समजावून दिली. सध्या अनेक गट आपल्या सोयी नुसार शिवाजी महाराजांचं उपयोग कसा करतात, यावर प्रकाश टाकला. त्याच बरोबर अनेक दृष्टिकोनातून शिव चरित्राचे संशोधन करण्यास वाव असल्याचे प्रतिपादन केले.
व्याख्यानासाठी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्याच बरोबर राज्यभरातील अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, अभ्यासक आणि संशीधक हे सुद्धा पूर्ण वेळ सहभागी होते. संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. विष्णू यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या इतिहास विभाग प्रमुख प्रा. सुनील धापसे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. IQAC च्या समानव्यक डॉ. एम. सत्याश्री यांनी आभार प्रदर्शनाची जवाबदारी पार पडली. इतिहास विभागाचे सह शिक्षक निमेश पाटील यांनी दोन्ही टप्प्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.