महाराष्ट्र

राज्यातील कर्मचाऱ्यांना 11% महागाई भत्ता विनाविलंब द्यावा – बिरसा फायटर्सचे सुशीलकुमार पावरा

# दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांच्या द्वारे मुख्यमंत्री व वित्त मंत्री यांना बिरसा फायटर्सचे निवेदन

दापोली. (प्रतिनिधी) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ राज्यातही विनाविलंब देण्यात यावी, अशी मागणी सुशीलकुमार संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स संस्थापक सुशीलकुमार पावरा यांनी जिल्हा रत्नागिरी येथील दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांना दिले आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांना 11% महागाई भत्ता विनाविलंब देण्याबाबतचे बिरसा फायटर्स यांचे निवेदन

यावेळी पावरा म्हणाले की, सातव्या वेतन आयोगानूसार केन्द्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 11 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानूसार केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तीधारकांना दि. 1 जानेवारी 2020 पासून 4%; दि. 1 जुलै 2020 पासून 3% तर दि. 1 जानेवारी 2021 पासून 4% अशी एकूण 11% महागाई वाढ दिली जाणार आहे. केंद्राप्रमाणे महागाई भत्ता वाढी राज्यात देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे.मात्र हा निर्णय उशीरा होत असल्याने,थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. जुलै ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील 5% दराने 5 महिन्यांची थकबाकी राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तीधारकांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. महागाई भत्त्त्याच्या थकबाकीमध्ये अधिक वाढ होऊ न देता, राज्यातील अधिकारी व कर्मचारी व सेवानिवृत्तीधारकांना सदरची थकबाकी देण्याचा तसेच केंद्राप्रमाणे 11% महागाई भत्ता वाढ देण्याचा निर्णय शासनाने विनाविलंब घ्यावा, अशी बिरसा फायटर्सचे संस्थापक सुशीलकुमार पावरा यांनी दापोली तहसीलदार वैशाली पाटील द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या कडे आग्रहाची मागणी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे