महाराष्ट्र

किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई. (प्रतिनिधी) – मुंबईसह महाराष्ट्रात अनेक किल्ले आणि सागरी किल्ले आहे. या सर्व किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व असून या किल्ल्याचे जतन, संवर्धन काळानुरुप होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात किल्ल्यांच्या विकासासाठी पुरातत्व संचालनालयाने सर्किट योजना तयार करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी मुंबईतील किल्ले, सागरी किल्ले, राज्य संग्रहालय आणि पुराभिलेख विभागाच्या योजनासंदर्भात मंत्रालयात आढावा घेतला.

सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील किल्ल्यांचे वैभव जपत असताना, गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करताना गड किल्ल्यांच्या ठिकाणी आवश्यक त्या पर्यटन सुविधा निर्माण करणे गरजेचे असल्याने यासाठी सुध्दा प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे असे राज्य संग्रहालय उभारण्यात येणार असून हे संग्रहालय नेमके कुठे असावे, या संग्रहालयात काय काय असावे याबाबींचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्व संचालनालयाने यापूर्वीच एक समिती गठीत केली आहे. या समितीने कोविडच्या काळात दोन बैठका यापूर्वीच केल्या आहेत. राज्य संग्रहालयासंदर्भात पुढील बाबी ठरविण्यासाठी लवकरच सहयाद्री अतिथीगृह येथे बैठक घेण्यात यावी असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले. कर्नाटक राज्यात शहाजी राजे यांची समाधी असून तेथे महाराष्ट्र शासनामार्फत त्यांचा पुतळा उभारता येईल हे पाहण्यासाठी पुरातत्व संचालकांनी स्वत: तेथे जाऊन त्या जागेची पाहणी करावी.आज पुराभिलेख संचालनालयाकडे ऐतिहासिक वारसा आहे. हा वारसा जतन करीत असताना डिजिटल स्वरुपात हा वारसा जतन करण्याच्या कामाला गती देण्यात यावी असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव जाधव, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालक तेजस गर्गे, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजित उगले उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे