महाराष्ट्र

मंत्रालयात दिलेल्या पत्राचा पाठपुरावा आता घर बसल्याच करा. आणि जाणून घ्या तुमच्या पत्राची अद्ययावत सद्यस्थिती..!

मुंबई. (प्रतिनिधी) – त्रासलेला व्यक्ती शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र शासन मंत्रालय कडे आपली कैफियत मांडण्यासाठी येत असतो. त्याने दिलेल्या निवेदनावर काय कार्यवाही झाली हे पाहण्यासाठी वारंवार त्याला मंत्रालयात यावे लागते. आता सर्व गोष्टींची सुटका होणार आहे. महाराष्ट्र शासन मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने आपले सरकार च्या grievances.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ‘ई-ऑफिस टपाल ट्रॅकर’ या पर्यायाचा वापर करून आपल्या पत्राची अद्ययावत माहिती मिळेल.

त्रासलेला व्यक्ती शेवटचा पर्याय म्हणून महाराष्ट्र शासन मंत्रालय कडे आपली कैफियत मांडण्यासाठी मंत्रालयातील विविध विभागाचे मंत्री, प्रधान सचिव, सचिव, उप सचिव यांची भेट घेऊन आपले म्हणणे लेखी निवेदनाद्वारे देत असतो. त्यानंतर त्याची पोच घेतो. पोच घेतल्यावर आता त्याला ई- ऑफिस क्रमांक दिला जातो. काही दिवसानंतर पुन्हा संबंधित व्यक्ती मंत्रालयात आपण दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करण्यासाठी येतो असतो. पण, आता यासर्व गोष्टींपासून तुमची सुटका होणार आहे. राज्य शासनाने मंत्रालातील गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांना सोयीसुविधा मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने एक नवीन ऑनलाइन प्रणाली विकसित केली आहे, ज्याद्वारे घरबसल्या नागरिकांना त्यांच्या पत्राची स्थिती तपासता येईल. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने grievances.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून “ई-ऑफिस टपाल ट्रॅकर” या पर्यायाचा उपयोग करून आपले पत्र कोणाच्या टेबलावर आहे आणि त्यावर काय कार्यवाही सुरू आहे, याची अद्ययावत माहिती मिळवता येईल.

# संकेतस्थळाची माहिती :-
grievances.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सामान्य प्रशासन विभागाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, जे महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवरून नागरिकांना तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच त्यांच्या तक्रारींची सद्यस्थिती पाहण्यासाठी सोयीची सुविधा देण्यात आली आहे.

# तर जाऊन घेऊ कसे पाहावे आपल्या पत्राची सद्यस्थिती ; प्रक्रिया खालील प्रमाणे
01) कोणत्याही ब्राउझरमध्ये www.google.co.in उघडा.
02) गुगल सर्च बारमध्ये grievances.maharashtra.gov.in टाइप करून एंटर दाबा.
03) वेबसाईटवर “तक्रार निवारण प्रणाली” चे मुख्य पृष्ठ उघडेल.
04) या पृष्ठाच्या वरच्या उजव्या बाजूला “ई-ऑफिस टपाल ट्रॅकर” असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
05) तिथे तुम्हाला ई-ऑफिस क्रमांक टाकायचा असेल, जो तुम्हाला मंत्रालयात पत्र दिल्यानंतर मिळालेला असेल.

क्रमांक टाकल्यावर तुमच्या तुमच्या पत्राची अद्यवत सद्यस्थिती समजेल. त्यामुळे तुम्हाला आता वारंवार मंत्रालयात जायची वेळ येणार नाही.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे