महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेचे पैसे परत जमा करता यावे म्हणून शासनाने जारी केले लेखाशीर्ष

मुंबई. (प्रतिनिधी) – लाडकी बहीण या योजनेचे पैसे अनेक महिला परत करत आहेत परंतु, ते पैसे कोणत्या लेखाशीर्ष खाली जमा करून घ्यावे याबाबत जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून वारंवार शासनाकडे कडे पत्र व्यवहार होत असल्याने शासनाने कार्यवाही करत लेखाशीर्ष जारी करून सर्व जिल्हाधिकारी परिपत्रकाद्वारे कळविले आहे. त्यामुळे आता महिलांना उक्त योजनेचे पैसे परत करता येणार आहे.

# शासनाने काय म्हंटले आहे या परिपत्रकात
महाराष्ट्र शासन मंत्रालय महिला व बाल विकास विभागाकडून क्रमांक. मबावि – २०२४ /प्र.क्र.१९०/कार्या- दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेकरिता पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी एखादा लाभार्थी योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास अथवा एखाद्या लाभार्थ्याने स्वतः होऊन लाभार्थ्यांच्या यादीतील त्यांचे नाव वगळण्याची विनंती केल्यामुळे त्यांना लाभाची रक्कम परत करावयाची असल्यास करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन व्हावे याबाबत क्षेत्रीय यंत्रणांकडून विनंती करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने लाभार्थ्याकडून रक्कम शासन खाती जमा करावयाची असल्यास सदर लाभाची रक्कम २२३५, सामाजिक सुरक्षा व कल्याण, ९११- अतिप्रदानांची वसुली, (००) (०१) वजा-अतिप्रदानाची वसुली (योजनांतर्गत) (कार्यक्रम), २२३५ बी ६०१, ७०- वजा वसुली या लेखाशीर्षाखाली जमा करण्यात यावी. तसेच, यानुषंगाने आपण प्रतिमाह माहिती आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांना सादर करावी. आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांनी सर्व जिल्हयांची माहिती संकलित करुन त्याचा मासिक अहवाल शासनास सादर करावा. असे या परिपत्रकात शासनाने म्हंटले असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना उक्त परिपत्रक पाठविले आहे.

यामुळे ज्या महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले असतील आणि आता त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे नको हवे असतील त्या महिला संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे ते पैसे परत करू शकतील.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे